Thursday, November 6, 2014

आखरी अदालत ! ( भाग दोन )


पुण्यात व्यसनमुक्ती केंद्रात एक महिना उपचार घेवून रमेश बाहेर पडला तेव्हा त्याची तब्येत छान झाली होती ..त्याचे व्यसन पुन्हा सुरु होऊ नये याची काळजी घेण्यासाठी तेथील समुपदेशकांनी रमेश ला काही पथ्ये सांगितली ..तसेच वडिलांना आणि पत्नीला देखील त्याच्यावर कसे नीट लक्ष ठेवायचे या बद्दल मार्गदर्शन केले ..काही दिवस बरे गेले ..मात्र जुन्या व्यसनी मित्रांना अजिबात भेटायचे नाही हे पथ्य काही रमेशच्या पचनी पडेना ..त्याच्या अनेक रिकामटेकड्या व्यसनी मित्रांचा अड्डा म्हणजे रमेशचे गॅरेज होते ..गॅरेज सुरु झाल्यावर काही दिवसातच व्यसनी मित्र पुन्हा तेथे जमू लागले ..रमेश ला त्यांना येथे येवू नका हे सांगणे काही जमले नाही ..आता ब्राऊन शुगर सोडलीय मात्र थोडी दारू प्यायला हरकत नाही असा मित्रांचा आग्रह रमेशला मोडता आला नाही ..पुंन्हा दारू तोंडाला लागली ..मग काही दिवसात पुन्हा ब्राऊन शुगर ..सहा महिन्यातच रमेश पूर्वपदावर आला ..काम करणे जीवावर येवू लागले ..पैसे कमी पडू लागले ..घरात रोज कटकटी सुरु झाल्या ..वडिलांनी पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले ..रमेशची पत्नी उषा गोंधळून गेली होती ...आपण नेमके काय केले म्हणजे नवरा व्यसनमुक्त राहील हे तिला समजेना ..हळू हळू मुले मोठी होत होती ..त्यांच्या भविष्याचा विचार करणे भाग होते तिला ..एकत्र कुटुंब असल्याने घरखर्च परस्पर भागात होता ..परंतु मुलांचा गरजांसाठी वारंवार सासऱ्याकडे पैसे मागणे अथवा दिरांकडे पैसे मागणे तिला प्रशस्त वाटेना ..स्वताचा काहीतरी व्यवसाय सुरु करावा म्हणून तिने महिलांच्या तयार कपड्यांची विक्री घरातच सुरु केली ..त्यात साड्या..पंजाबी ड्रेस .वगैरे गोष्टी होत्या ..सासऱ्याने तीला भांडवल दिले होते ..रमेश व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडल्यावर काही काळ चांगला राही ..परंतु काही दिवसातच मूळपदावर येई ..असे सुमारे सहा वेळा झाले ..
नंतर घरातील कटकटी वाढल्या म्हणून वडिलांनी रमेशला वेगळे घर करून दिले ..ते घर पत्नीच्या नावावर घेवून दिले त्यांनी ..मोठा मुलगा पाहता पाहता दहावीला गेला ..उषा कसातरी व्यवसाय करून घरखर्च चालवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती ..मात्र रमेशचे व्यसन सुरु झाले की ती गोडीगुलाबीने ..दमदाटी करून ..भांडून तिच्याकडील सर्व पैसे काढून घेई .. व्यसनात उडवे..उषाच्या माहेरहून तिचा भावू तिला थोडीफार मदत करी ..मात्र स्वताचा नवरा असा नालायक आहे आणि आपल्याला मुलांच्या पालन पोषणासाठी माहेरची मदत घ्यावी लागते हे काही उषाच्या मनाला पटेना ..परंतु तिचा नाईलाज होता ..रमेशला वारंवार व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून त्याचे वडील देखील वैतागलेले ..एके दिवशी त्यांनी स्पष्ट सांगितले ..आता मी तुला काहीही मदत करणार नाही ..तुझा संसार तूच सांभाळ ..मुले मोठी होत आहेत..आत्ता जर सावरला नाहीस तर मग आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल ..रमेशचे बेफाम वागणे सुरूच होते ..उषाच्या दृष्टीने त्यातल्या त्यात एक बाब बरी होती की रमेश कितीही भांडण झाले तरी तिला मारझोड वगैरे करत नसे कधी ..तो फक्त तिच्याकडे पैसे दे म्हणून लकडा लावत असे ..तिने पैसे दिले नाहीत तर तिच्या नकळत घरातील एखादी वस्तू चोरून नेई ..ती विकून आपले व्यसन भागवत असे ..बाहेर चोऱ्या करण्याइतके धैर्य त्याच्याकडे नव्हते ..रमेशची तव्ब्येत खालावू लागताच किवा त्याचा त्रास वाढला की आता त्याच्या वडिलांऐवजी ती पुढाकार घेवून रमेशला ..व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करू लागली ..त्यासाठी माहेरहून पैसे आणावे लागत असत तिला ..असे दोन वेळा झाले ..एव्हाना रमेशने त्याचे गॅरेज विकून टाकले होते ..व मित्राच्या गॅरेज मध्ये काम करू लागला होता ..ते देखील अनियमित असे ..हळू हळू उषा निराश होत होती ..रमेशच्या वागण्याने ती वैफल्यग्रस्त झाली होती ...हल्ली तिचीदेखील चिडचिड वाढली ..कधी कधी ती आपला राग मुलांवर काढू लागली ..हसतमुख उषा दुर्मुखली ..पुढे कसे होणार ही चिंता सतत मन पोखरत होती ..या निराशेच्या भरात एकदा तिने पाहिल्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला ..सुमारे वीस पंचवीस फुटांवरून खाली पडल्याने जबर दुखापत झाली ..जीव वाचला परंतु पाय मोडला ..उजवा पाय जायबंदी झाला ..काही काळ कुबड्यांच्या आधारावर जगणे नशिबी आले ..नंतर एका हाती काठी घेवून तिला चालता येवू लागले .
या प्रकारानंतर सासऱ्यांनी शेवटची संधी म्हणून रमेशला पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात दखल केले ..या वेळी समुपदेशकाने रमेशला बजावले .." बाबारे तुझी व्यसन करण्याची जिद्द सोड .तू थोड्या प्रमाणात कधीही व्यसन करू शकत नाहीस हे मान्य कर ..प्रयोग बंद कर .. कोणत्याही प्रकारचे व्यसन न करणे हेच आता तुझ्या हाती शिल्लक आहे ..तुझ्या व्यसनामुळे आता पत्नीच्या जीवावर बेतले होते ..बिचारीच्या नशिबी आता कायमचे अपंगत्व आलेय ..जोवर तुझ्या सुधारणेसाठी माणसे प्रयत्न करत आहेत तोवर भानावर ये ..जेव्हा निसर्ग यात दाखल देईल तेव्हा फार मोठे नुकसान होईल ..तुझा नाहीतर दुसऱ्या कोणाचा तरी जीव जाईल शेवटी ..मग सक्तीने व्यसन बंद करावे लागेल तुला ..शिवाय तेव्हा व्यसन सोडल्यावर देखील जे गमावशील ते पुन्हा कधीही भरून निघणार नाही हे ध्यानात ठेव " रमेशने यंत्रवत मान डोलावली होती तेव्हा ..बाहेर पडल्यावर पहिले पाढे पंचावन्न ..आता मुलांचा शाळेचा खर्च परवडत नाही म्हणून उषाने दहावीनंतर मुलाला शाळा सोडून काकाच्या किराणा दुकानात बसायला सांगितले ..काका हळू हळू याला दुकानदारीत तरबेज करेल मग त्याला एखादा छोटा व्यवसाय काढून देता येईल या आशेने ..अतिशय हुशार मुलगा वडिलांच्या व्यसनामुळे शाळा सोडून दुकानात बसू लागला ..त्याचा पगार तुटपुंजा असला तरी तेव्हढाच उषाला हातखर्चाला आधार होता ..
( बाकी पुढील भागात )

Wednesday, November 5, 2014

आखरी अदालत ! ( भाग एक )


बंदी उघडली तसा नेहमीप्रमाणे रमेश सर्कलच्या गेटजवळ जावून बसला ...आपल्याला कोणी भेटायला येतेय का ? घरून काही निरोप येतोय का याची वाट पाहत ..खरेतर मुलाखत घेण्याची वेळ सकाळी १० नंतर सुरु होई ....इतक्या सकाळी कोणी भेटायला येणे शक्यच नव्हते तरी रमेश सकाळी ६ वाजता बॅरॅकचे दरवाजे उघडले की असा गेटसमोर जावून बसे ..ही ब्याद सकाळी सकाळी आली म्हणून पहाऱ्यावरील वार्डनने रमेशला पाहून शिव्या हासडल्या आणि त्याला हाकलले ..मग हताश पणे रमेश चहाच्या लाईनीत लागलेल्या कैद्यांमध्ये गेला ...भिशीतून चहा घेऊन येणारे आले .. तशी लाईनीत एकच गोंधळ उडाला...धक्काबुक्कीत रमेश बाजूला फेकला गेला ..त्याने पुन्हा लाईनीत जाण्याचा प्रयत्न केला नाही ..तसाच विमनस्क उभा राहिला ..चहा वाटप होऊन गेले ..सगळे कैदी अंघोळ व इतर विधी करण्यासाठी आवारात पांगले तरीही रमेश तसाच विमनस्क उभा होता ..एका वार्डन ने त्याला हटकले आणि त्याच्या हाती खराटा देवून त्याला सगळे आवार झाडण्याचे काम दिले ..निमुटपणे रमेश खराटा घेवून यंत्रवत आवारात पडलेली वाळकी पाने ..आणि इतर कचरा झाडू लागला..बिडीचे थोटूक दिसताच ते काळजीपूर्वक उचलून खिश्यात ठेवू लागला..बराच वेळ रमेशला निरखत असलेला एक म्हातारा कैदी त्याच्या बाजूच्या कैद्याला म्हणाला " बेचारा फालतू में मर्डर केस मे फस गया है..अब घरवाले ना तो जामीन दे रहे है..ना मिलने आ रहे है ..बरबाद हो गया पुरा "
रमेश एका चांगल्या खात्यापित्या कुटुंबातील मुलगा ..वडिलांचा किराणा दुकानाचा व्यवसाय ..त्यांनी प्रगती करून एका वडिलोपार्जित दुकानाची दोन दुकाने केलेली .. नेटका संसार ..आर्थिक संपन्नतेमुळे वडिलांनी मुलांना शहरातील महागड्या कॉन्वेंट मध्ये दाखल केले होते शिक्षणासाठी ..मोठा सुरेश ...बहिण मीना आणे धाकटा रमेश ..तिघेही कडक इस्त्रीचे पांढरे कपडे घालून शाळेत जायला निघाले की वडिलांचा उर अभिमानाने भरून येई ..फाळणीनंतर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून आलेले हे कुटुंब ..कसातरी जीव वाचवून कंगाल अवस्थेत भारतात आलेले ..नंतर कष्ट करून नव्याने उभारी घेवून दहा बारा वर्षातच महाराष्ट्रात स्थिरावलेले ..मोठा सुरेश आणि मीना दोघेही शाळेत रमले ..मात्र धाकटा रमेश इयत्ता आठवीपासून बिघडला ..शाळेला दांड्या मारू लागलेला ..वर्गातील नेमके बिघडलेले मित्र निवडून त्यांच्या सोबत मस्ती फिरू लागला ..दहावीपर्यंत कसेतरी शिकला.. दहावीला अडकला ..अभ्यासात डोके चालेनासे झालेले ..दोन तीन वेळा दहावी पास होण्याचा लटका प्रयत्न करून...शेवटी शिक्षण सोडून देवून एका मित्राच्या गॅरेज मध्ये जावून बसू लागलेला..वडिलांच्या दुकानाच्या व्यापामुळे त्यांना सगळीकडे लक्ष देणे एकंदरीत कठीणच होते ..रमेश मित्राच्या स्कूटर मोटारसायकल दुरुस्त करण्याच्या गॅरेजमध्ये हळू हळू दुरुस्तीचे काम शिकत गेला ..त्याबरोबरच धुम्रपान आणि अधूनमधून दारू प्यायला देखील शिकला ..मुळचा हुशार असल्याने लवकरच तो दुरुस्तीच्या कामात तरबेज झाला ..वडिलांनी भांडवल घालून त्याला स्वताचे गॅरेज सुरु करण्यास मदत केली ..अल्पावधीत मृदू भाषा ...कल्पक डोके यामुळे नामवंत मॅकेनिक म्हणून नाव कमावले त्याने ..क्वचित दारू पिणारा रमेश आता आठवड्यातून एकदा तरी दारू पिवू लागला ..कधी कधी जास्त वेळा ..
योग्य वयात आल्यावर वडिलांनी मोठ्या भावाप्रमाणे रमेशचे देखील लग्न लावून दिले ..बारावीपर्यंत शिकलेली उषा घरात धाकटी सून म्हणून आली ..रमेश नंतर मुलगी मीनाला सुस्थळी पाठवून वडील निर्धास्त झाले ..सुरेश वडिलांच्याच दुकानात मदत करू लागला ..या सर्व सुखाला गालबोट म्हणजे रमेशचे दारू पिणे ..वडिलांनी एकदोन वेळा खूप रागावल्यावर रमेश ने दारू सोडून ..तोंडाला वास न येणारी.. कोणाला लवकर समजू शकणारी नशा निवडली..तो आता गांजाच्या अड्ड्यावर जावू लागला ..आणि तेथेच एकेदिवशी त्याने ब्राऊन शुगरची देखील चव घेतली ..रमेशचे गॅरेज त्यावेळी ऐन भरात होते ..रोज किमान पाचशे रुपये तरी कमावत असे तो .. रमेश रोज ब्राऊन शुगर ओढू लागला ..तोवर रमेश आणि उषाच्या संसारात दोन गोंडस मुले आलेली ..महेश आणि संगीता ...उषा खुश होती आपल्या संसारात.. कारण तोवर तिला रमेशच्या व्यसनाची झळ पोचलेली नव्हती ..रमेश भरपूर पैसे कमावत होता ..व्यसने वगैरे धंदे बाहेरच परस्पर भागवत होता ..उलट घरात देखील पैसे देत होता ..मात्र व्यसन वाढत गेले तसे.. पैश्यांची कमतरत भासू लागली ..रमेशला पैसे पुरेनासे झाले ..घरात पैसे देणे बंद केले त्याने ..वडिलांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी रमेशला फैलावर घेतले ..बाहेरून आडून पाडून माहिती घेवून हा काय काय धंदे करतो त्याची माहिती घेतली तेव्हा त्यांना समजले की हा व्यसनी झालाय इतकेच नव्हे तर ब्राऊन शुगर सारखे भयानक व्यसन करतोय ..निर्व्यसनी असलेल्या वडिलांनी ताबडतोब रमेशला पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले..
( बाकी पुढील भागात 

Saturday, November 1, 2014

काफिर ! ( भाग तीन )


उस्मानचे नेमके काय करावे हा मोठाच प्रश्न होता सगळ्या कुटुंबांपुढे ..अल्लाच्या कृपेने घरात समृद्धी होती मात्र शांती नव्हती ..रोज नमाज पढतांना असलमशेठच्या मनात हटकून उस्मानचा विचार येत असे ..त्यांची एकाग्रता भंग होई ..अल्लाची इबादत करताना मन एकाग्र करणे कठीण होऊ लागले ..आज पहाटेच झोपमोड झाल्याने नंतर ते झोपू शकले नव्हते ..सकाळ उलटून गेली तरी असलमशेठ अंथरुणात आहेत हे जाणवून फातीमाबेगम त्यांना उठवायला आल्या तेव्हा त्यांना असलमशेठ जागेच आढळले ..जागरणाने त्यांचे डोळे लाल होऊन सुजल्यासारखे झालेले .." या अल्ला ..आपकी तबियत तो ठीक है ? " काळजीने त्यांनी पतीच्या डोक्याला हात लावून पहिला ..ताप नव्हता अजिबात ..मग त्यांच्या लक्षात आले ..हा उस्मान बद्दलचा मनस्ताप आहे .. " अभी तो वो नादान है ..उसकी शादी कर देंगे तो आ जायेगा ठीकानेपर " फातीमाबेगमचे हे बोलणे ऐकून असलम शेठ भडकले " बेगम आप ही के लाड प्यार ने उसे बिगाडा है..जब देखो तब उसे नादान कहेती हो ..उसकी शादी कर देंगे तो पराये घर की लडकी की जिंदगी बरबाद कर देगा ये ..आप एक बार हा कहेदो तो उसे अभी उठवाकर नशामुक्ती केंद्र में भरती करवा देंगे " असलमशेठ ने व्यसनमुक्ती केंद्राचा विषय काढला ..ते ऐकून फातिमाबेगमचा चेहरा उतरला ..त्यांना आठवले मागच्या वेळी उस्मानला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल असताना ..भेटायला गेलो होतो तेव्हा उस्मान ने त्यांना धमकी दिली होती .." आप मुझे यहाँ से तुरंत ले चलो ..वरना मेरा मरा मुँह देखना पडेगा ..मै खुद्खुशी कर लुंगा .." मुलाचे हे बोलणे ऐकून त्या मातेचे हृदय पाघळले होते ..त्याच्या हट्टापुढे मान तुकवावी लागली होती ..उस्मान लहानपणापासून जिद्दी ..हट्टी स्वभावाचा होता ..तो बोलतोय तसे खरेच करेल या वर त्या माउलीचा विश्वास बसला ..तेथील समुपदेशकाने त्यांना खूप समजावले की " सिर्फ आपको डराने के लिये खुद्खुशी की बात कर रहा है ..हमारे लोग अच्छेसे खयाल रखेंगे के उस्मान ऐसा ना करे " तरीही फातीमाबेगम ने त्याला घरी नेण्याचा हेका सोडला नव्हता ..त्या वेळी असलाम शेठ म्हणाले होते " वैसे भी तो ये नशा करके खुद्खुशी ही कर रहा है..रोज तिलतिल मर रहा है ..साथ में पुरे परिवार को भी घसीट रहा है..उससे अच्छा के एक बार में मर जाये " हा सगळा संवाद आठवून त्या पाणावलेल्या डोळ्यांनी तेथून निघून गेल्या ...असलमशेठ एक सुस्कारा टाकत उठले अंथरुणातून ...
दिवसभर असाच अवस्थतेत गेला ..उस्मानला कशाशीही देणे घेणे राहिले नव्हते ..तो नेहमी प्रमाणे त्याची वेळ झाल्यावर घराबाहेर पडला... संध्याकाळी नेमका असलम शेठ नमाज पढताना घरात आला ..फातीमाबेगम कडे पैसे मागू लागला ..त्यांनी नकार दिल्यावर याने आरडा ओरडा सुरु केला ..ते ऐकून मोठा भाऊ हुसेन खालच्या मजल्यावर आला ..तो उस्मानला रागावू लागला ..आवाज वाढले ..हुसेनची बेगम देखील खाली आली ..प्रयत्न पूर्वक या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असलम शेठ नमाज पढत राहिले ...दोन्ही भावात शिवीगाळ सुरु झाली होती ..शेवटी न राहवून असलमशेठ ने डोळे उघडले ..समोर भिंतीवर बंदूक लटकत होती ..तरुणपणी शिकारीचा शौक होता असलमशेठना ..तसेच शेतात आलेली रान डुकरे हाकलण्यासाठी ते पूर्वी बंदुकीचा वापर करत असत ..हवेत बार काढून रान डुकराना पळवणे सोपे जाई ..हा पोरगा आता तसाच सुव्वर झालाय ..याला हाकलण्यासाठी बंदूकच हवी ..हा विचार मनात येताच असलमशेठ क्षणभर बावरले ..हे भलतेच काय ..स्वताच्या मुलावर बंदूक..मन द्विधा झाले होते ..इकडे उस्मानचा गोंधळ सुरूच ..नमाज पढताना विघ्न आणणारा हा काफिर संपायलाच हवा ही भावना तीव्र होत गेली ..
आता दोघे भावू एकमेकांना भिडले होते ..हाथापाई सुरु झालेली दोघांची ..हुसेनची बेगम ..फातिमा बेगम यांचे किंचाळणे ..लहान पोरांची रडारड ..तुंबळ माजले होते घरात ..आपल्या सारख्याच्या घरी हे रणकंदन सहन होईना असलमशेठना ..तिरमिरीत ते उठले ..भिंतीवरची बंदूक खेचून बाहेरच्या हॉल मध्ये आले ..त्यांच्या या एन्ट्रीने सगळेच एकदम घाबरले .." अब्बू ..आप जाने दिजीये .." हुसेन बापाला थांबवण्याचा प्रयत्न करत होता ..मात्र आता काफिर संपलाच पाहिजे हा निर्धार पक्का होता असलमशेठचा ..बंदूक वर झाली आणि धडाडली..थेट उस्मानच्या छातीवर ....अविश्वासाने अब्बुंकडे पाहत उस्मान खाली कोसळला ..बंदूक खाली टाकून असलमशेठ धाय मोकलून रडू लागले ..काय झालेय हे लक्षात येताच फातिमा बेगम उस्मानच्या कलेवराकडे धावल्या . हुसेन बापाकडे धावला ..शेवटी उस्मानचा करुण अंत झाला ..आपल्या कृत्याबद्दल असलमशेठना अजिबात पश्चाताप नव्हता ..आपण एक सैतान संपवला याचे समाधान वाटत होते त्यांना ..नाहीतरी तो नशा करून ..सर्वनाश करून घेवून ..तडफडून टाचा घासत.. कुत्र्याच्या मौतीने मरणारच होता ..त्या ऐवजी मी त्याला एका झटक्यात संपवले अशी त्यांची खात्री ...असलमशेठ जेल मध्ये जायला ..फासावर चढायला तयार होते ..
ही घटना आहे १९९३ -९४ च्या सुमाराची ..नंतर दोन्ही भावांनी वडिलांना शिक्षा होऊ नये म्हणून जिवाचे रान केले ..हा अपघात आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न केला ..उस्मानच्या डोक्यावर परिणाम झालेला होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला ..या केसचे पुढे काय झाले ते माहिती नाही मला .!

काफिर ! ( भाग दोन )


आपल्याला जबरदस्तीने व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करणार नाहीत याची खात्री झाल्यावर तर उस्मान अधिकच निर्धास्त झालेला ..त्याला धार्मिक ..सामाजिक आणि इतर पद्धतीने देखील असलम शेठ ने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता ..पण परिणाम शून्य ..तात्पुरता तो सारे ऐकून घेई ..मान डोलावून सगळे समजत आहे असे भासवी ..आणि बोलणे संपले की सगळे विसरून देखील जाई ..असलमशेठची खात्री पटत चालली होती की याच्या मनात सैतानाने प्रवेश केलेला आहे ..याच्या बुद्धीवर सैतानाचे आधिपत्य आहे ..तो सैतान काढून टाकल्याशिवाय हा भानावर येणार नाही ..इमान ..फर्ज ..इबादत ..वगैरे याच्यापुढे व्यर्थ आहे ..अल्लाने दिलेल्या अनमोल शरीराची देखील याला किंमत उरलेली नाहीय..शेवटी असलमशेठ ने पुढाकार घेवून फातिमा बेगमना खूप भलेबुरे सुनावले ..त्याला पैसे देशील तर खबरदार ..एकदा फातिमा बेगमने त्यांच्याखातर मनावर दगड ठेवून उस्मानला पैसे देण्यास नकार दिला ..तेव्हा त्याने खूप गोंधळ घातला ..माझा हिस्सा ..माझा संपत्तीतील वाटा ..वगैरे बोलून सगळ्यांनाच दुखावले ..तरीही सगळे ठाम राहिले ..मग कटकट करत हा बाहेर निघून गेला आणि दोन तासात उस्मानला घेवून घरी पोलीस हजर ..त्यांनी म्हणे उस्मानला दमदाटी करून एका माणसाकडून पैसे लुबाडतांना पकडले होते ..म्हणजे आता हा घरी पैसे मिळाले नाहीत ..तर बाहेर चोऱ्या करणार ..लोकांना लुबाडणार ..एखादे दिवशी जेल मध्ये जाणार ..उस्मानच्या जेल मध्ये जाण्याच्या कल्पनेनेच असलमशेठना घाम फुटला होता ..समाजात आपली केवढी बदनामी होणार ..कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही आपल्याला ..त्यांनी उभी हयात इमानइतबारे घालवली होती ..कधी कोणाशी भांडण नाही ..कोणाला दुखावणे नाही ..इतकेच काय त्यांनी कधी शिवी देखील दिली नव्हती कोणाला ..' अल्लाचा नेक बंदा ' म्हणूनच सगळे त्यांना ओळखत असत ..त्या दिवशी असलमशेठने विनंती करून उस्मानला पोलिसी कारवाई पासून वाचवले होते ..पोलिसांना देखील असलमशेठच्या घरी असे अपत्य निपजावे याचे वैषम्य वाटले होते..
उस्मानच्या बाबतीत मात्र आपण फर्ज निभावण्यात कमी पडलो असे हल्ली त्यांना वाटत होते ..हा पोरगा काही आपल्याला मेल्यावर आपल्याला ' जन्नत' लाभू देणार नाही याची खात्री पटत चालली होती ..मेल्यावर ' जन्नत ' तर सोडाच ..जिवंतपणी याने आपले जीवन ' दोजख ' ( नर्क ) करून टाकले आहे या विचाराने ते अवस्थ होत असत ..हल्ली कसेही करून सगळ्या घरादाराला कलंक असणाऱ्या या सैतानाचा निकाल लावलाच पाहिजे असे विचार त्यांच्या मनात घर करू लागले होते ..हा विचार मनात येताच त्यांचा थरकाप होई ..आपली औलाद सैतान आहे सत्य जाणवले की ते अधिक अधिक बैचैन होत असत ..त्यानाही ब्लडप्रेशर चा त्रास होऊ लागला ..दिवसेंदिवस अधिक बिघडत जाणाऱ्या उस्मानचे काय करावे हे मोठेच कोडे होते .. वारंवार फातिमा बेगमना ताकीद देवूनही त्या काही मन कठोर करू शकत नव्हत्या ..उस्मानला पुन्हा जबरदस्ती का होईना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करावे हे काही फातिमा बेगमच्या पचनी पडत नव्हते ..फातिमा बेगमनी कोठून तरी एका पीर बाबाची माहिती आणली होती ..त्या बाबाने दिलेले मंतरलेले पाणी सुद्धा उस्मान च्या नकळत त्याला पाजून झाले ..अजमेर शरीफला जावून ' मन्नत ' मागून झाली ..कोण काय सांगेल ते करायला असलमशेठ तयार झाले होते पोरासाठी ..प्रचीती येते असा बोलबाला असलेल्या सगळ्या दर्ग्यांवर हजेरी लावून झालेली ..
अलीकडे तर असलमशेठ च्या घरात सतत कटकटी होत होत्या ..मोठे भावू वारंवार असलमशेठशी भांडू लागले होते..याला घरातून हाकलून द्या म्हणून त्यांनी लकडा लावला होता ..याच्यामुळे आमची देखील बदनामी होतेय ..याचे भावू म्हणवून घ्यायला आम्हाला लाज वाटते ..तुम्ही हो म्हणाल तर एकदा याच्या दोन्ही तंगड्या तोडतो ..म्हणजे लंगडा बनून घरात बसून राहील..मग नशा करायला बाहेर जाता येणार नाही याला असा सरळ सरळ हिशोब केला होता भावांनी..त्यासाठी दोनचार महिने जेल मध्ये देखील जायची तयारी होती दोन्ही भावांची ..त्यांची मुले मोठी होत होती ..त्यांना भीती वाटे की याची सावली आपल्या मुलांवर पडली तर ते देखील बिघडतील ..ते मुलांना उस्मान घरात असताना खालच्या मजल्यावर अजिबात येवू देवू नसत ..उस्मानला वाटे की सगळे उगाच माझ्याशी वैर करतात ..मला वेगळे वागवतात ..या विचाराने तो अधिकच बेभान होई ..डोके फिरले की घरात नको नको त्या शिव्या देई ..फेकाफेक करी ..धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी अवस्था झालेली सगळ्यांची !
( बाकी पुढील भागात )

Friday, October 31, 2014

काफिर ! ( भाग एक )


असलम शेठचा नुकताच डोळा लागला होता ..बाहेर एकदम कुत्र्यांचा कालवा झाला ...तारस्वरात काहीतरी अघटीत घडत असल्याची बोंब ठोकत होती कुत्री ..त्यांच्या कर्कश्य भुंकण्याने असलम शेठची झोप चाळवली ..बंगल्याचे दार उघडून ते अंगणात आले ..अंगणात लावलेल्या बल्बच्या प्रकाशात त्यांना एक जण बंगल्याच्या गेट वर चढलेला दिसला ..." आ गया नालायक " असे स्वतःशी पुटपुटत ते पुढे झाले ..त्यांना पाहून उस्मान क्षणभर थबकला ..मग गेटवरून उडी मारून आत आला ..मान खाली घालून उभा राहिला .." तो अब अपनेही घर मी चोरो जैसे घुसनेकी बारी आ गई जनाब ? " असलमशेठ च्या या प्रश्नार्थक उपहासावर उस्मान कडे काहीच उत्तर नव्हते ..तो नुसताच शुंभासारखा उभा राहिला ..दारातून शेठ बाजूला होण्याची वाट पाहत ..." आप घर में रातभर नही आते तो भी कोई फर्क नही पडता .." शेठच्या या बोलण्याने दुखावल्या सारखा असलम त्यांच्याकडे रोखून पाहू लागला ...तितक्यात मागून लगबगीने फातिमा बेगम बाहेर आल्या ..बाप लेकांची पुन्हा खडाजंगी होणार हे ओळखून सारवा सारव करू लागल्या .." बेटा समय पे घर आया करो ..हम सब इंतजार करते रहेते है आपका ..चलो अंदर चलकर खान खावो " असे म्हणून त्यांनी उस्मानला हात धरून घरात आणले ..हताशपणे असलम शेठ मागे फिरले ..पुन्हा बेडवर येवून झोपेची आराधना करू लागले ..बाहेर सगळ्या पंचक्रोशीत दबदबा असलेले असलम शेठ उस्मान प्रकरणात हतबल झाले होते ..उस्मान त्यांचे तिसरे अपत्य ..पहिल्या दोन मुलांनंतर सुमारे दहा वर्षांनी झालेले शेंडाफळ ..लहानपणापासून खूप लाडात वाढलेला ..पढाईत खूप हुशार ..बोलण्यात चतुर ..दिसायला देखणा उस्मान गेल्या चार वर्षांपासून मात्र बिघडला होता ..घरातील अनियमितता वाढली होती ..वारंवार पैसे मागणे ..रात्री बेरात्री घरी येणे ..रागावल्यास डोळ्याला डोळा भिडवून उलट उत्तरे देणे ..हे बदल असलम शेठची चिंता वाढवणारे होते ..त्यांनी फातिमा बेगमला या बद्दल पूर्वीच सावध केले होते ..त्याचे फालतू लाड करू नकोस असे बजावले होते ..मात्र उस्मानची अम्मी पुत्रप्रेमाने आंधळी झाली होती ..सगळेच आपल्या उस्मानला रागावतात ..हिडीसफिडीस करतात ..म्हणून तो असा वागतो असे त्यांना वाटे ..
असलम शेठ म्हणजे गावातले बडे प्रस्थ होते ..पिढ्या नु पिढ्या चालत आलेली जमीनदारी ..घरात पैश्यांची काही कमतरता नाही ...नोकरचाकर ..मान मरातब ..घरातील धार्मिक वातावरण ..उस्मान सोडून सगळे जण पाच वेळा नमाज पढून " अल्ला " ची करुणा भाकणारे...असलम शेठचे वय झाले तसे मोठ्या दोघांनी शेतीवाडीत लक्ष घातले होते ..अब्बुंची जवाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती .. गेल्या दोन चार वर्षात हट्टी आणि जिद्दी असणारा उस्मान बिघडलाय हे सर्वप्रथम मोठ्या भावाच्या हुसेनच्या कानावर आले होते ..हुसेनच्या मित्राने त्याला उस्मान गावातील बियरबार मध्ये दिसला असे सांगितले..त्याच दिवशी हुसेनने उस्मानला फैलावर घेतले होते ..कुराण शरीफ मध्ये ' शराब ' हराम आहे असे म्हंटले आहे हे त्याला सांगितले ..उम्मानने तेवढ्यापुरते मोठ्या भावाचे ऐकून घेतले ..मात्र त्याच्या वर्तनात काही बदल झाला नाही ..तेव्हाच हुसेनने घरात बजावले होते ..याला अजिबात पैसे द्यायचे नाहीत ..हा बाहेर पैसे उडवतो ..हराम गोष्टींवर पैसा खर्च करतो वगैरे ..परंतु फातिमा बेगम चोरून लपून उस्मानला पैसे पुरवत असत .घरात इतकी समृद्धी असताना ..पोराला दोनचार रुपयांसाठी कोणाकडे हात पसरव लागू नये असे त्यांना मनापासून वाटे ..शराब हराम आहे हे वारंवार सांगितल्यावर एकदा हुसेन ने उस्मानला ' अल्ला ' चा वास्ता दिला ..तेव्हा काही दिवस बरे गेले ..नंतर उस्मान शराब ऐवजी गांजाच्या अड्ड्याकडे दिसला असे हुसेनला समजले ..पुन्हा हुसेन लहान भावाला रागावला ..तेव्हा " कुराणशरीफ में सिर्फ शराब हराम लिखा है ..गांजा नही " असे विचित्र उत्तर दिले होते उस्मानने .." सभी प्रकार की नशा हराम मानी जाती है " असे समजावून देखील उस्मान काही सुधारत नव्हता ..एकदा तर दोन्ही मोठ्या भावांनी मिळून उस्मानला गुरासारखा बडवला होता ..घरात दोन दिवस बांधून ठेवला होता ..त्यावेळी फातिमा बेगम आजारी पडल्या ..त्यांनीही दोन दिवस अन्न ग्रहण केले नव्हते ..शेवटी अम्मी पुढे हतबल झाल्याने दोन्ही भावांनी उस्मानला रागावणे सोडले होते ..ते दोघेही आपापला संसार घेवून वरच्या मजल्यावर राहायला गेले ..खालच्या मजल्यावर असलमशेठ ..फातिमा आणि उस्मान असे तिघेच राहू लागलेले ..असलम शेठनी दोन तीन वेळा उस्मानला समज देण्याचा प्रयत्न केला ..उस्मान उलट उत्तरे देतो .आपला मान ठेवत नाही हे लक्षात आल्यावर ते व्यथित झाले होते ..अलीकडे उस्मान ब्राऊन शुगरच्या नादी लागलाय असे ही त्यांच्या कानावर आले होते ...
एकदा प्रेमाने बोलून त्यांनी उस्मानला गळ घातली..व्यसनमुक्ती केंद्रात भरती होण्याचा आग्रह केला ..त्याला गोडी गुलाबीने मुंबईला नेले ..तेथील नामवंत व्यसनमुक्ती केंद्रात भरती केले..आता उस्मान सुधारेल अशी त्यांना आशा होती ..तेथे तीन महिन्यांचा कोर्स होता ..परंतु पंधरा दिवसांनी सगळे कुटुंब उस्मानला भेटायला गेले तेव्हा..उस्मानने रडारड केली..घरी घेवून चला असा हट्ट केला ..शपथा घेतल्या ..फातिमा बेगमचे दिल पाघळले ..उस्मानला घरी घेवून जावू असा त्यांनी देखील आग्रह केला ..तेथील समुपदेशकांनी फातिमा बेगमला खूप समजावले..याला पूर्ण उपचार घेवू द्या म्हणून ..परंतु शेवटी फातिमा बेगमच्या हट्टापुढे कोणाचेही काहीच चालले नाही ..एकतर फातिमा बेगमना हल्ली ब्लडप्रेशरचा त्रास सुरु झाला होता ..त्यांच्या मनाविरुद्ध झाले तर ब्लड प्रेशर वाढून त्यांच्या जीवाला धोका होईल या भीतीने ..उस्मानला घरी आणावे लागले होते..घरी आल्यावर चार पाच दिवसातच उस्मान पुन्हा बाहेर जावू लागला होता ...त्याच मित्रांमध्ये जावून ब्राऊन शुगर ओढू लागला होता ..आता काही केल्या तो व्यसनमुक्ती केंद्रात जायला तयार होत नव्ह्ता ..त्याला जबरदस्तीने व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याच्या आड फातिमा बेगमचे पुत्रपेम येत होते .
( बाकी पुढील भागात )

Wednesday, October 29, 2014

दिवाळीची दैना ! ( भाग तीन )


रखमी एकूण पाच घरी काम करी ..सगळीकडे धुणे आणि भांडी ..आठवड्यातून एकदा फरश्या पुसणे हा बिनपगारी ओव्हरटाईम..आज उद्विग्न अवस्थेत होती ती ..कामाच्या ठिकाणी पोरांना घेवून जायला तिला आवडत नसे ..कारण तेथे पोरे उगाच मालकिणीच्या घरातील वस्तून हात लावत असत ..त्यावेळी त्यांच्या नजरेतील अप्रूप तिला आवडत नसे..तसेच घरातील माणसे देखील सारखी पोरांना इथे नको हात लावू ..अरे ते तुटेल ..फुटेल ..असे रागवत असत ..एक दोन ठिकाणी तर मालकिणीने तिला सरळच सांगितले होते की पोरांना इथे आणू नकोस..आम्हाला उगाच लक्ष ठेवावे लागते त्यांच्या कडे ..एकदा राजाने एका घरातला चेंडू उचलून आणला होता खेळता खेळता ..त्य दिवशी तिने राजाला मार मार मारले .दुसऱ्याच्या वस्तूंना हात लावायचा नाही..असे न सांगता न विचारता वस्तू उचलली तर ती चोरी असते हे त्याला चांगलेच उमगले..तेव्हापासून राजाने स्वतःहूनच तिच्या सोबत जाणें नाकारले होते..आज मात्र नाईलाजाने तिला दोन्ही पोरे घेवून निघावे लागले होते कामावर ..प्रत्येक घरी दिवाळीची धूम होती चांगलीच ..मुलांना नवीन कपडे ..नवीन वस्तू ..घरात गोडधोड ..पाहुणे रावळे..रखमीचे काम देखील वाढलेले ..भांडी घासता घासता रखमीला राहवले नाही.. तिने हळूच घरच्या मालकिणी कडे आगावू पैसे मागितले ..दिवाळी आहे पोरांना फाटके आणायचे आहेत हे सांगितले ..आधीच रखमीच्या अंगावर पैसे होते त्यांचे ..पोरांना फटाके आणायचे आहेत म्हंटल्यावर मालकिणीने तोंड कसेनुसे केले ..म्हणाली " अग किती प्रदूषण होते त्या फटाक्यांनी....नुसता पैश्यांचा धूर सगळीकडे ..तुम्हा लोकांना कधी समजणार निसर्गाचे महत्व ? " रखमीने नुसतीच लाचारीने मान डोलावली ..कालच त्या मालकिणीच्या पोरांनी रखमीला आम्ही या वेळी पाच हजार रुपयांचे फटके आणलेत हे सांगितलेले आठवले रखमीला ..पण ती काहीच बोलली नाही ..शेवटी मालकिणीने तिला दोनशे रुपये दिले ..वर सल्ला दिला उगाच फटाके आणू नका याचे त्यापेक्षा काहीतरी गोड धोड खा ..संध्याकाळी फटाके फोडताना राजाच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदाचे स्वप्न पाहत रखमीने मान हलवून होकार दिला ..
दुपारी घरी आल्यावर संध्याकाळी फटाके घेवू म्हणून तिने ते पैसे साखरेच्या पुडीत लपवले ..हल्ली सदा पैश्यांसाठी सगळे घर धुंडाळत असे ..शेवटी तिच्या कपड्यात हात घालून लपवलेले पैसे देखील काढून नेत असे..हे आठवून तिने या वेळी पैसे नीट नवीन जागेत लपवले होते ..सदाची दिवाळी सकाळपासूनच सुरु झालेली ..पिवून मस्त होऊन तो बाजूच्या दारुड्या मित्राशी काहीतरी बडबड करत बसला होता ..रखमी तावातावाने पोरांना घेवून कामावर गेली तेव्हाच त्याने ताडले होते की आता ही नक्की पोराच्या फटाक्यासाठी आगावू पैसे घेवून येणार ..त्याने तिच्या नकळत तिला पैसे लपवताना हेरले ..आणि तिचे लक्ष नसताना ते पैसे काढून पुन्हा बाहेर सटकला ..संध्याकाळी जेव्हा रखमीला पैसे गायब झाल्याचे समजले तेव्हा तिचा तिळपापड झाला ..रागाने वेडीपिशी झाली ती ..इकडे राजा आणि चिंगीची फटाके हवेत म्हणून कटकट सुरूच होती .सदाला शिव्या घालत ती या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधात होती ..गेली चाळीस वर्षे या दारूने तीला जगणे नकोसे केलेले ..आधी बाप नंतर नवरा ..सदा आला की त्याला जाब विचारायचा..आज सगळा हिशोब करायचा हे ठरवत होती ..बाहेर अंधारून आलेले ..फटाक्यांचे आवाज ..हर्षोल्हास..कोलाहल ..राजा आणि चिंगी आसुसलेल्या डोळ्यांनी ते पाहत होते ..मधून मधून रखमीकडे फटाक्यांचा लकडा लावत होते ..अगतिक रखमी शेवटी त्यांना समजावून थकली ...दोन धपाटे घातले दोघांना ..मग रडत्या पोरांना तिनेही रडतच उराशी कवटाळले .. झोपडीत तेवणाऱ्या चिमणीच्या प्रकाशात तिघेही स्तब्ध बसून राहिले .. हलणाऱ्या चिमणीच्या ज्योतीबरोबर त्याच्या सावल्या भयाण होऊन हलत होत्या ..
कोणाला तरी शिव्या घालत ..बडबडत अडखळत सदा घरात शिरला तेव्हा रखमी त्याच्या अंगावर ओरडली ..वाट्टोळ केलस मुडद्या तू माह्यावालं..पोराच्या फटाक्यांचे पैसे पण नेलेस त्या दारूच्या मढयावर घालायला ..किडे पडतील तुला ..सदा पण तिला शिव्या देवू लागला ..तिच्या अंगावर चालून गेला ..पोरांची रडारड सुरु झाली ..बाहेरच्या फटक्यांच्या आवाजात यांचा कोलाहल ..आज रखमीच्या अंगात दहा हत्तीचे बळ चढलेले ..त्यांच्या झटापटीत धक्का लागून चिमणी विझली ..अंधारात ओरडण्याचे..धडपडीचे..आवाज ..मग सदाची अस्फुट किंचाळी .. एकदम सगळा कोलाहल शांत झाला ..रखमीने चाचपडत चिमणी लावली ..रक्ताच्या थारोळ्यात सदा निपचित पडला होता ..बाजूलाच झटापटीत रखमीच्या हाती आलेला वरवंटा..रखमी भानावर येवून पोरांना ओढत बाहेर पडली..वाट फुटेल तशी चालत राहिली ..स्टेशनवर समोर असलेल्या गाडीत बसली ..भेदरून पोरे तिला चिटकून बसली होती ..दुसऱ्या दिवशी पंचनाम्याला आलेल्या पोलिसांना सदाच्या दारुड्या मित्राने माहिती पुरवली .. वर्तमान पत्रात बातमी आली .. अनैतिक संबंधातून नवऱ्याच्या खून...नवऱ्याने अनैतिक संबंधांचा राग येवून जाब विचारल्याने रागावून पत्नीने त्याच्या डोक्यात वरवंटा मारून त्याचा खून केला ..आरोपी दोन मुलांसह फरार ..पुढील तपास सुरु आहे .
( समाप्त )

Monday, October 27, 2014

दिवाळीची दैना ! ( भाग दोन )


बाप गेल्यावर रखमी सर्वार्थाने एकटी पडली ..तिला इतक्या वर्षात इतर कोणी नातलग माहितीच नव्हते ..लहानपणीच बाप म्हणे दारीद्र्याला वैतागून गाव सोडून मुंबईला निघून आलेला ..मुंबईत राबत ..घाम गाळत..लाचारीने मोठा झालेला..एका गवंड्याच्या हाताखाली गवंडीकाम शिकून तयार झाला .. त्याच गुरुकडून याला दारूचा वसा मिळालेला ..त्याच्याच पोरीशी पाट लावून संसारी झालेला ..इतकीच स्टोरी रखमीला माय कडून समजली होती ..बाप गेल्यावर ती खूप सैरभैर झाली ..दहा दिवस घराबाहेर पडलीच नाही..झोपडपट्टीतल्या शेजारयानीच बापाचे सर्व विधी उरकले ..त्या खर्चासाठी तिने चार घरी धुणेभांड्याचे आगावू पैसे घेवून ..अंगावर कर्ज देखील करून ठेवलेले..बाप जाता जाता आपल्याला कर्जाच्या ओझ्याखाली टाकून गेला हे लक्षात आल्यावर तिने कंबर कसली कष्ट वाढवले ...बाप गेल्यावर तिला एक जाणवले ..बाप जिवंत असे पर्यंत मर्यादेने वागणारे .आता उघड उघड सलगी करू पाहू लागले ..येता जाता तिची ख्याली खुशाली विचारू लागलेले ..वर काही कमी जास्त झाल्यास मदत करण्याची एका पायावर तयारी असल्याचे सांगू लागले ...ती रहात असलेल्या झोपडपट्टी पासून ते ज्या घरी काम करी तेथील पुरुषांपर्यंत सगळ्यांची तीच तऱ्हा..फक्त तिला भुलवण्याचे मार्ग वेगवेगळे ..तिने मन खंबीर केलेले होते ..कोणत्याही अमिषाला बळी पडायचे नाही ..बाजूला राहत असलेल्या ...अनेक उन्हाळे काढलेल्या..मात्र आता सर्वच दृष्टीने निरुपयोगी ठरलेल्या म्हातारीने तिला सल्ला दिला .." पोरी लवकर एखादा चांगला मुलगा पाहून पाट लावून घे त्याच्याशी..नाहीतर वाऱ्यावर उडालेल्या कागदा सारखे नाचावे लागेल तुला वारं येईल तसे..कसा का असेना शरीराला मालक हवा ..एखाद्या अवघड क्षणी निसर्ग डाव साधेल मग कायमच हरत जाशील ..म्हातारीच्या सल्ला तिच्या मनात रुजला होता ..जाता येता चौकात दिसणाऱ्या सदा वर तिची नजर रेंगाळली ..पार ती नजरेआड होईपर्यंत तो तिला निशब्द पहात असे ..हा बाजूच्या झोपडपट्टीत राहणारा ड्रायव्हर म्हणून काम करतो हे तिला तिच्या मैत्रिणीकडून समजले होते ..एके दिवशी धाडस करून सदाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ..तिने देखील तोंड न वेंगाडता त्याला प्रतिसाद दिला ..
आयुष्यातले धुंद दिवस सुरु झाले ..स्वप्नवत असलेले..जीव ओवाळून टाकावेसे वाटणारे ..याच क्षणांच्या बदल्यात सारे आयुष्य उन्हाळा सहन करण्याची ताकद मिळावी असे मंतरलेले दिवस ...त्याच धुंदीत तिने सदाशी पाट लावून घेतला ..तिच्या झोपडीतील किडूक मिडूक सामान त्याच्या खोपटात सामावले गेले ..कधी नव्हे ते रखमा सिनेमाला जावू लागली ..पहिल्यांदा अंगावर दुकानात जावून विकत घेतलेले नवे कोरे कपडे आले ..असे दोन वर्ष गेल्यावर राजाचा जन्म झाला ..मग वर्ष भरात चिंगी ..मात्र या चिमुकल्यांच्या प्रवेशासोबत झोपडीत अधेमध्ये दारूचा आंबूस वास यायला सुरवात झाली ..रखमीने सदाला सावध केले ..ही दारू संसाराचे वाटोळे करते हा मोलाचा सल्ला दिला ..पण सदाने पुरुषी बेफिकीरीने तो सल्ला धुडकावला ..मग तिने शपथ घातली ..स्वताची ..मग पोरांची ..शपथे नंतर काही दिवस चांगले जात मात्र लवकरच सदाला आपल्याच काय पोरांच्या देखील शपथेची किंमत राहिली नाही हे ती उमगली ..मग तिने राग दर्शविला ..बडबड केली तसे ..सदा देखील प्रत्युत्तर देवू लागला ..एकमेकांची उणी दुणी काढणे सुरु झाले ..सदाच्या रूपाने जणू काही आपला मेलेला बापच परत आलाय की काय असे वाटू लागले ..पुढे पुढे सदा अंगावर हात टाकू लागला ..अगदी लाथा बुक्क्यांनी तुडवी लागला तिला ..सात जन्माची वैरीण असल्यासारखी तिला वागवू लागला ..ती मार खाई तरी देखील त्याला बोलणे सोडत नव्हती ..आपल्या लेकरांचे भविष्य अंधारात आहे हे जाणवून ती भेदरली होती ..कसेही करून दारूला याने सोडचिट्ठी द्यावी म्हणून तिने कोण काय सांगेल ते उपास तापास केले .. नवस बोलली..परंतु सदा दिवसेंदिवस जास्तच बिथरत चालला होता ..हल्ली तर त्याने तिच्या चारीत्र्या वर चिखलफेक करणे सुरु केलेले ..त्याच्या तोंडाला येणाऱ्या दारूच्या वासाने तिला मळमळल्या सारखे होई म्हणून ती त्याच्यापासून अंतर वाढवू लागली ..तसे तू बाहेर उंडारतेस ..पासली पडतेस..घरचे सोडून बाहेर पोट भर खातेस वगैरे बोलू लागला ..ती कामावर निघाली की उपहासाने हसू लागला ..तिला तोंड दाबून बुक्क्यांचा मार देवू लागला ..तिला वाटले आपल्याला माहेर असते तर किती बरे झाले असते ..किमान रागाने माहेरी जाता आले असते ..पण या दारुनेच तिचे माहेर हिरावले होते ..रडत खडत दिवस चालले होते ..अनेकदा तिच्या मनात आत्महत्येचे विचार येत ..पण आपल्या मागे पोरांचे काय हाल होतील या धास्तीने ती ते विचार परतवून लावी ..एकदा तिने भांडी घासता घासता घरच्या मालकिणीला आपली व्यथा सांगितली ..त्या मालकिणीने सरळ पोलिसात जा ..तक्रार कर नवऱ्याची असा सल्ला दिला ..तिला ते प्रशस्त वाटले नाही तरीही एकदा प्रयोग म्हणून ती जवळच्या चौकीत गेली ..तेथे नवरा मारतो ..शिव्या देतो वगैरे सांगितले ..तर हा तुमचा घरगुती मामला आहे ..असे सांगून तिची बोळवण केली गेली ..कोणाच्या तरी सांगण्यावरून ती कौटुंबिक सल्ला केंद्रात गेली ..तेथे आपले रडगाणे गायले ..तेथील बाईने रीतसर तक्रार घेतली ..नवऱ्याला समज देऊ असे सांगून एक पोलीस पाठवला तिच्या सोबत सदाला दम द्यायला ...त्या नंतर दोन दिवस बरे गेले ..नंतर सदा पुन्हा पिवून आला ..या वेळी तर तू धंदा करतेस ..पोलिसांना तंगड्या देतेस ..वगैरे बोलला ..ती तशीच अंधारात पोलीस स्टेशनला गेली ..पोलिसांनी त्याला पकडून नेले ..एक दिवस कोठडीत डांबून ..दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केले ..तेथे नवऱ्याने कान पकडले ..सर्वांची माफी मागितली ..त्याला सोडले गेले ..पुन्हा तेच ..
शेवटी आता आपले भोग आहेत हे ..भोगूनच संपवले पाहिजेत या विचाराने ती चूप बसली .. तिला मार खायची सवय पडली ..मात्र निष्पाप पोरांवर सदा हात उचलू लागला तेव्हा ती वाघिणी सारखी चवताळली ..पोरांचे रक्षण करू लागली ..आज सकाळी सकाळी राजाने फटाक्यांची मागणी सुरु केली होती ..सदाच्या पिण्यापायी घरात पैसा थांबत नव्हता ..त्याची नोकरी सुटलेली ..तिच्या धुणी भांड्याचे पैसे तो तिच्याकडून हिसकावून नेई .जेमतेम दोन वेळा पोटभर अन्न मिळत होते .. पोराला फटाके आणू कुठून हे तिला समजत नव्हते ..पोराच्या हट्टाने ती फटाकड्याच्या द्काना पर्यंत जावून आलेली ..चार सुरसु-यांची ची पेटी पन्नास रुपये ..ही किंमत ऐकून परत मागे फिरली ..आता एखाद्या घरी पुन्हा आगावू पैसे मागून किमान पोराला सुरसूरया तरी घेवून देवू असा विचार केला होता तिने ..पण राजाला आताच्या आत्ता फटके हवे होते ..पोर आपल्यामागे मार खाईल या विचाराने ती दोन्ही पोरांना सोबत घेवून कामावर जायला निघाली ..सदा मागे शिव्या देत राहिला..त्याच्याकडे दुर्लक्ष करून..
( बाकी पुढील भागात )